त्रिशंकू
कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि नवीन नोकरीला लागलेल्या प्रत्येक तरुणासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पुढची वरच्या पगाराची नोकरी शोधण्याची पाळी न येता त्या नोकरीची ऑफर येणे. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मान आणि जास्त पैसे मिळणार असतात. पहिली नोकरी आता रेझ्युमेवर एक ‘एक्स्पीरियंस’ बनतो, आणि तुम्ही ऑफिसमध्ये ‘सिनियर’ बनण्याच्या दिशेने पाहिलं पाउल टाकता. मात्र इथे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नसतो, पुढे जबाबदाऱ्या वाढणार असतात आणि असंख्य तडजोडी कराव्या लागणार असतात या गोष्टी तुम्ही वाढत्या पगार आणि स्टेटसच्या मोहापायी विसरून जाता. नेमकी हीच चूक मी पण केली. अंतरराष्ट्रीय राजकारणात मला असलेली रुची पाहून बोधीसत्वांनी स्वतः “अकलेचे तारे” या ते नव्यानेच संपादक बनलेल्या मराठी दैनिकात जागतिक बातम्या देणाऱ्या विभागाचा उपसंपादक म्हणून नोकरी ऑफर केली, आणि मोठ्या पगाराला भुलून मी ती तत्काळ स्वीकारली. इंग्लिश चेनल सोडून आता मी मराठीत शिरलो, आणि अक्षरशः अंधारात चाचपडू लागलो. ग्रामीण “भारत” आणि शहरी, “इंडिया” अशी एक मोठी दरी आपल्या देशात असल्याचं प्रसारमाध्यमे सांगत असतात. त्या दरीच्या मधोम